Thursday 1 July 2010

दिनविशेष - जुलै महीना ...सळसळलेल्या इतिहासाचा ... !

जुलै महीन्याला मराठ्यांच्या दिनविशेषामध्ये अतिशय विशेष स्थान आहे... काय नाही घडले जुलै महिन्यात.... मग वर्ष कुठलेही असो... तुम्हीच वाचून बघा... जुलै महीना कसा सळसळलेल्या इतिहासाचा आहे...

ज्या-ज्या शब्दांना लिंक्स दिल्या आहेत त्या आवर्जुन वाचा...


 १ जुलै १६९३ - छत्रपति संभाजी राजांच्या मृत्यूनंतर मोघलांकड़े गेलेल्या सिंहगडचा ताबा 'नवजी बलकावडे' या सरदाराने परत स्वराज्यात आणला.


४ जुलै १७२९ - सरखेल कान्होजी आंग्रे स्मरणदिन. समाधी स्थळ - ठुकराली नका, अलिबाग.

६ जुलै १७३५ - मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास आले तेव्हा पेशवे बाजीराव थोरले त्यांना भेटण्यास घोरपडीपावेतो सामोरे गेले.
८ जुलै १९१० - स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेल्सच्या (फ्रांस) समुद्रात उडी घेतली.

१२ जुलै १६६० - पावनखिंड - बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली. जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओशाळवले.

" तोफे आधी न मरे बाजी. "

"दर काही मिनिटांना पालखीचे भोई बदलत, वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत ते ६०० वीर विजेच्या वेगाने पळत सुटले होते. उदिष्ट एकच होत - विशाळगड़. हातात नंग्या तलवारी घेउन बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते. मागचे आणि पुढचे हेर बित्तंबातमी राजांकड़े पोचवत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती. क्षण अन क्षण आता महत्त्वाचा होता" ... पुढे वाचा...

११ जुलै १६५९ - शिवाजी राजे अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी राजगड वरुन निघून प्रतापगड येथे पोचले.



१२ जुलै १९०८ - लोकमान्य टिळकांना मंडालेची सहा वर्षांची शिक्षा झाली, या घटनेला १२ जुलै रोजी १०२ वर्षे पूर्ण.

१५ जुलै १६७४ - मुघल सरदार बहादूरखान कोकलताश याच्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. सुमारे १ कोटीची लूट रायगडावर जमा झाली

२० जुलै १७६१ - माधवराव यांनी पेशवेपदाची सूत्रे हाती घेतली.

२२ जुलै १६७८ - तामीलनाडू मधील वेलोरचा किल्ला रघुनाथपंत व आनंदराव मकाजी यांनी जिंकला.

२३ जुलै १८५६ - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १५३ वी जयंती.

२५ जुलै १६६६ - औरंगजेबाने शिवरायांसोबत आग्रा येथे आलेल्या मराठा फौजेचे परतीचे परवाने शिवरायांकड़े सुपूर्त केले.

२५ जुलै १६४८ - विजापूर बादशाहाच्या आज्ञेने मुस्तफाखानाने 'जिंजी'नजीक शहाजी राजांना कैद केले.


३१ जुलै १६५७ - मुघलांनी विजापुरचा 'कल्याणी' किल्ला जिंकून घेतला.