Monday 15 March 2010

गुढीपाडवा आणि छत्रपति संभाजी महाराज ... !

गुढीपाडव्याच्या नेमक्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्येला औरंगजेबाने छत्रपति संभाजी महाराजांचा वढू - तूळापूर येथे शिरच्छेद केला.

१ फेब १६८९ रोजी शंभुराजे आणि कवी कुलेश यांना संगमेश्वर येथे कैद केले गले होते. बहादुरगड़ येथे त्यांच्यावर भयानक आणि असंख्य हाल केले. पहिल्यादिवशीच त्यांचे नेत्र फोडले गेले. त्यांची जीभ कापली गेली. कोडे मारून नंतर अंगावरील चामडी सोलण्यात आली. इतके करून देखील मराठा छत्रपति आपल्याला दाद देत नाही हे बघता अखेर ११ मार्च १६८९ ला म्हणजे फाल्गुन अमावस्येला त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

आमचे कोल्हापुरचे मित्र संभाजी यांनी या दिवसानिमित्त लिहिलेली कविता फोटो सकट देत आहे.


3 comments:

  1. कविता अप्रतिम आहे!!

    ReplyDelete
  2. KAVITA VACHUN ANGAVAR ROMANCH UBHE RAHILE...SHAMBHU RAJANCHI AATHVAN KARUN DILYABADDAL DHANYWAD!!

    ReplyDelete
  3. धन्यवाद आशिष, मनमौजी.. त्यांच्या बलिदानाचे आपल्याला सतत स्मरण राहो...

    ReplyDelete